सर्व प्रसार माध्यमे तंत्र दिवसेंदिवस विकासित होत आहेत. माध्यमचा उपयोग अधिकधिक लोक करीत आहेत. त्यात स्त्रियांचा हिस्सा मोठा आहे. सर्व प्रसार माध्यमांत लोकांवर प्रभाव पाडणारे माध्यम म्हणजे सिनेमा. स्त्रिया बाहेर पडल्या कलाक्षेत्रात चमकू लागल्या परंतु कुठेही त्याच्यातल्या दुय्यम भूमिकेचे त्यांचे इतरांचे भान सुटत नाही. विकसित होत जाणाऱ्या प्रसार माध्यमांतून स्त्रीची प्रतिमा, व्यक्तीमत्व विकसित होणे दूरच उलट एक मालकीची वस्तू म्हणून तिचे जाहिररित्या प्रगटीकरण केले जाते.
स्त्रियांची प्रसार माध्यमांत खरंच खूपच प्रगती केली आहे. प्रत्येक सिनेमा ,सिरियल सगळ्यांमध्ये स्त्रीयांचे स्थान जास्त दिसून येते. चित्रपटात एखादी स्त्री साडी घालून खूप दागिने घालून नटलेली असे वर्णन केले जाते.बहुतेक अॅडसमध्ये स्त्रीयांचे स्थान मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे स्त्रीयांना स्वतंत्र मिळाले आहे पण दुसरीकडे खेडेगावात त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही त्यांचे घरचे त्यांना प्रोत्साहन देत नाही. स्त्रियांना खेडेगावात कमी दर्जा दिला जातो. स्त्रियांनी बाहेर पडायचे नाही त्यांनी चूल-मूल इतकाच संसार सांभाळायचा अशी गावाच्या लोकांची समज आहे. स्त्रिया प्रगती करत असतील तर त्यांच्यावर बंधने आणली जातात.
स्त्रियांनी प्रसार माध्यमांत प्रगती केली तर त्यांना समाज वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहत असतो. स्त्रियांना नको-नको ते बोलले जाते. त्यांनी जर फॅशनचे कपडे घातले तर पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. स्त्रियांना किती त्रास सहन करावा लागतो. जुन्या काळातील लोकांचे विचार बदलायला हवे. स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे त्यांना जर स्वतंत्र दिले तर खूप प्रगती करू शकतात. एखादी गावातील स्त्री जर शिक्षित झाली तर तिला तुच्छ लेखले जाते हा लोकांचा समज दूर केला पाहिजे. स्त्रियांनाही पुरुषाप्रमाणे संधी मिळाली पाहिजे.
शहराकडे स्त्रीयांना सगळया सुविधा उपलब्ध आहेत गावाकडे सुविधा नसताना त्या प्रगती करून पुढे आल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. स्त्रियांकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारखे आहेत. स्त्रियांनी सिद्ध करून दाखविले आहे की आम्ही पण करू शकतो. स्त्रियांमुळे देशाचा विकास होऊ लागला आहे. बेटी बचावो,बेटी पढावो ही मोहीम प्रत्येक घरात राबवली पाहिजे.
Sunday, September 8, 2019
स्त्रियांची प्रसार माध्यमातील भूमिका
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment