मुलगी शिकली प्रगती झाली हे बोधवाक्य आपण नेहमी वाचतो. 1848 मध्ये जोतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना सुशिक्षित करून त्यांना ती चालवायला दिली. मुलीच्या शिक्षणाने समाज सुधारतो.एक शिकलेली मुलगी मोठेपणी सबंध कुटुंब सुशिक्षित करते. शिक्षण स्त्री उद्धाराचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे. मुलांना शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे. एक आई म्हणून आपल्या मुलांचा जसा अभ्यास घेईल तसा कोणत्याही शिकवणी वर्गात घेतला जाऊ शकत नाही. कारण सुशिक्षित आई अभ्यासाबरोबर चांगले वागणे, सच्चेपणा,प्रामाणिकपणा,प्रेम आणि आणखी कितीतरी संस्कार मुलांवर घडवते. शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळे मानवात खूप मोठय़ा प्रमाणावर बदल झाले आहेत.शिक्षण घेतल्यामुळे मानवाला हक्काचे महत्व समजते. आजच्या काळात पैसा, संपत्ती याला महत्त्व दिले गेले आहे. सुशिक्षित व्यक्ती आपल्या आवडी-निवडी आपले हक्क होत असलेला भ्रष्टाचार थांबवू शकतात.सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले यांनी स्त्रीयांना शिक्षण देण्यासाठी मोठ-मोठया अडचणीना घेतल्यामुळे स्त्रिया आपल्या पायावर उभ्या आहेत.
आजच्या काळात कोणत्याही पदावर जायचे असेल तर कोणतेही काम करायचे असेल तर व्यक्तीचे शिक्षण विचारात घेतले जाते.आजच्या काळात जर मान-संपत्ती मिळवायची असेल तर पहिले त्या व्यक्तीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. आज शिक्षणाला संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेले आहे. गावाकडे महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही. ग्रामीण भागात मुलीचे शिक्षण असो की महिलांचे सक्षमीकरण आपल्याकडे परिस्थिती तेवढी चांगली नाही. मुलीचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे हे समाजाने ओळखायला हवे. महिलांवर होणारे अन्याय महिलांनी सक्षमरित्या सामना करून सोडविले पाहिजेत.शक्ती ही महिलांमध्ये शिक्षणामुळे येऊ शकते. शिक्षण घेतल्याने आपल्या जीवनाला एक दिशा मिळते. मुलगी शिकून काय करणार? ही पालकांची भावना अजूनही दूर झालेली नाही. घराबाहेर जाणे दूरची गोष्ट हिंदुस्तान स्वतंत्र झाला त्या वेळी देशासमोर निरक्षरता फार मोठी समस्या होती. आज समाजात शिक्षणामुळे नवनवीन शोध लागले आहेत. समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा नाहीशी झाली. आज सरकारने 18 वर्षाखालील मुलांना शिक्षण देणे सक्तीचे केले आहे. सरकारने प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार दिला आहे.
Tuesday, September 10, 2019
स्त्री शिक्षणाचे महत्त्व
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment