Sunday, February 2, 2020

मोबाईल


मोबाईल हा आताच्या जगात लोकांचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे . मोबाईल मुळे दूरपर्यंत लोकांशी संपर्क साधू शकतो प्रत्येक वेळी आपल्याला तिथे जाणे शक्य नसते जगभरातील सगळ्या प्रकारची माहिती आपण मोबाईलवर पाहु शकतो आजकाल लहानापासून मोठ्यापर्यत सगळे मोबाईलचा वापर करतात आता पुर्वी सारखे नही आहे एखाद्याला संदेश पाठवायचा असेल तर आपण लगेच त्या व्यक्तीला फोन करु शकतो. मोबाईल हे जणू ज्ञानाचे भांडारच आहे.मोबाईलवर अनेक विडियो, चित्रपट, गाणी, ई-पेपर विविध प्रकारची माहिती पाहू शकतो. मोबाईल एक प्रकारचा मनोरंजनाचे साधन सुद्धा आहे. लहानातल्या लहान मुलांना मोबाईलचे ज्ञान आहे. मानव पुस्तक वाचण्याऐवजी मोबाईलला महत्त्व देत आहे. मोबाईल मानवाच्या कुटुंबातील एक सदस्य झाला आहे पण मोबाईलचा पाहिजे तिथेच उपयोग व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात अस होत का? मुले मोबाईलवर नको-नको ते बघत असतात. आई-वडिल सुद्धा जिद्दीने हट्ट पुरवतात रोजच्या दैनंदिन जीवनात पाहत आहेत की मोबाईल शिवाय जगणे कसे अवघड झाले आहे. संपर्क साधण्यापासून ते मनोरंजनापर्यत आपण सर्व क्रिया मोबाईलवर करत असतो.
            सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जवळचा मोबाईल दूर गेला किंवा चार्जिंगला लावलेला असेल तरीसुध्दा आपण त्यामध्ये येणारे मेसेज वाचण्यासाठी सतत मोबाईल पाहत असतात. मोबाईलमुळे आपले जीवन जेवढे सुखी  झालेले पाहतो तेव्हा दु:खी पण झालेले आढळून येते. मोबाईलचा फायदा आहे तितका तोटासुद्धा आहे.मोबाईल आल्याने सर्व लोक मोबाईलवर व्यस्त असतात. एकमेकांशी बोलणे तर दूरच एकमेकांकडे बघत  सुद्धा नाही. मोबाईलचा अनेक मुलांवर प्रभाव पडला आहे. लहान वयातच चश्मे लागले आहेत. शाळकरी मुले सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण होत नाही.मान्य आहे युग तंत्रज्ञानाचे आहे परंतु तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य वेळी योग्य ठिकाणी झाला पाहिजे त्यासाठी काही बंधने असायला पाहिजे. लहान शाळकरी मुलांकडे पाहतोय की स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे पण त्याचा वापर योग्य होतो की नाही याची खात्री होणे गरजेचे आहे.
     
       
     

No comments:

Post a Comment