Sunday, February 2, 2020

दूरदर्शन

दूरदर्शन 1920 साली यांत्रिकी करामतीमधून सुरु झालेला प्रवास आज त्रिमिती अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रापर्यत झाला आहे. अवकाशातल्या परग्रहावरच्या हालचाली सुद्धा आपण घरबसल्या पाहू शकतो.26 जानेवारी 1926 साली  टेलिव्हिजनचा दूरचित्रवाणीचा शोध लावला. जॉन लॉगी बेअर्ड या वैज्ञानिकांने टेलिव्हिजनचा शोध लावला. पुढे 1927 साली अमेरिकेत दूरचित्रवाणीच्या प्रक्षेपणाला सुरुवात झाली.1950 साली बीबीसी लंडन या वाहिनीने पहिल्यांदा व्यावसायिक पातळीवर दूरचित्रवाणीच्या प्रक्षेपणाला सुरुवात केली.9 ऑगस्ट 1984 साली दिल्लीत दूरदर्शनचे पहिले क्रेंद सुरु करण्यात आले.भारतीय माध्यमातील इलेक्ट्रॉनिक युगाची सुरुवात दूरदर्शनमुळे झाली.58 वर्षापूर्वी दूरदर्शनचे सगळ्यांना नवल वाटायच.हलती डोलती चित्र डोळ्यासमोर हे त्याच्यासाठी नवीनच होत याची कल्पना करणे कठीण आहे. दूरदर्शनचा प्रसार देशभर पसरला. दूरदर्शन बघणारा प्रेक्षक हळूहळू वाढत चालला.
  
  दूरदर्शनवरून बातमीची सुरुवात 1965 पासून सुरु झाली.1972 मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण देण्याचा प्रयोग भारतात केला. जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रसार घरोघरी करण्यात आला.1982 साली देशात एशियाई क्रीडा स्पर्धामुळे दूरदर्शन खेड्यापाडयात पोहचले.लोकांना टीव्हीची नाही तर भाकरीची गरज होती. ज्या खेड्यात वीज नव्हती तिथे आल्यावर अनेकांना पहिल्यांदा दूरदर्शन संच विकत घेतले. टीव्हीमुळे लोकांचे मनोरंजन व्हायचे.पूर्वी दूरदर्शनवर 1 तासाचा चित्रपट असायच दर शनिवारी एक तासाच्या कार्टूनचे कार्यक्रम असायचे.प्रत्येक कार्यक्रमासाठी डझनवारी 24.तासांच्या वाहिन्या  सुरु झाल्या आहेत. सुमारे वीस वर्षापुर्वी सर्व कुटुंब एकत्रितपणे दूरदर्शनचे कार्यक्रम बघायचे. दूरदर्शनमुळे अनेक कलाकारांना चित्रपटात रोजगाराची संधी मिळाली.
     प्रेक्षक वर्गाना खेळवून ठेवण्यासाठी व आपल्या चैनलची लोकप्रियता वाढविण्यासाठी व जाहिरातीच्या युगामध्ये आपले चैनलचे अस्तित्व टिकवण्यासाठी नवनवीन कल्पना सुचवून टीव्ही सिरियलची निर्मिती करण्यात आली. दूरचित्रवाणीला जरी इडियट बॉक्स जरी म्हणत असले तरी त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. हे नाकारता येत नाही सध्याच्या काळात टीव्हीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात वाढत चालण्याचे दिसून येते.
उदाहरण- रामायण, महाभारत,इत्यादी कार्यक्रमांनी लोकांना आकर्षित केले.
    दूरदर्शनचे फायदे
1 टेलिव्हिजन मुळे सगळ्याचे मनोरंजन होते.
2 वेळ पटकन निघून जातो.
3 देशाभरातली माहिती मिळते
4 मनाला आराम मिळतो
5 अनेक कलाकारांना रोजगार मिळाला
   दूरदर्शशनचे तोटे
1 डोळ्यांना हानी  होते
2 दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहत जेवल्यास वाईट परिणाम होतो
3 अयोग्य कार्यक्रम पाहिल्यामुळे कुसंस्कार होतात
4 वाईट सवयी लागून भावी आयुष्यावर विपरीत परिणाम होतो
5 भुतांच्या विषयी असलेल्या मालिका पाहून मुले घाबरतात आणि रात्री झोपेत दचकून किंचाळून किंवा रडत उठतात
6 परिक्षा जवळ आली तरी मुलांना दूरदर्शन वरचा कार्यक्रम पाहण्याचा मोह आवरत नाही
7 कुटुंबाला वेळ देत नाही.
          

No comments:

Post a Comment