Sunday, February 16, 2020

शेतकरी मुलाखत

दिनांक  11/2/20  ला  आम्ही  विरार  वेस्ट बोळिंज  रानपाडा  गावात  शेतकऱ्याची  मुलाखत  घेतली.  आम्ही. हेमलता  नारायण  घरत  यांची  मुलाखत  घेतली. त्यांच्या  शेतात आम्ही  त्यांची   मुलाखत  घेतली.  आम्हाला  शेतीबद्दल    त्यांनी   चांगल्या   प्रकारे   माहिती  सांगितली. आम्हाला  शेतीबद्दल  थोडी   फार   माहिती  मिळाली. नवीन ठिकाणी  नव-नवीन  गोष्टींचे ज्ञान मिळाले. शेतकऱ्यांना  शेतीत  खूप  कष्ट   करायला  लागते  कष्ट  केल्यानंतर   त्यांना  शेतीत  उत्पन्न  मिळते. उदरनिर्वाहासाठी  त्यांना शेतीवर  अवलंबून  राहावे  लागते. शेतकऱ्यांना प्रत्येक  पिकांची  व्यवस्थित  लागवड  करावी  लागते.
शेतकरी   आहेत  म्हणून   अन्न-धान्य, भाजीपाला   मिळते.  संपूर्ण  देश  शेतकऱ्यांवर   अवलंबून   आहे. उन्हाळा, हिवाळा,   पावसाळा   आला   तरी  शेतकऱ्यांना  कुठल्याही   परिस्थितीत 
शेतात  काम  करावे  लागते. शेतकऱ्यांचे  बहुतेक   वेळा   नुकसानही  होते. प्रत्येक  वेळी  शेतकऱ्यांना  पाहिजे  तसा नफा  मिळत  नाही. शेतकऱ्यांना  अनेक समस्यांना  सामोरे  जावे  लागते. शेतकऱ्याची  मुलाखत  घेतल्यावर   हे   चांगले  अनुभव  आम्हाला आले.
    
                प्रश्न-उत्तरे
1  तुम्ही किती वर्षांपासून शेती करतात ?
उत्तर : ते गेल्या  30  वर्षांपासून  शेती  करतात.
2  तुम्ही शेतात कोणते पिक घेतात ?
उत्तर : ते  अगोदर  शेतात  लाल पटणी, सफेद पटणी  हे  पिक  घ्यायचे  आता  ते  जास्वंद, बोर, केळी ,चिकू, आंबा,जांभूळ, नारळ,तुळशी, वांगी, मुळा,कोथिंबीर, पालेभाज्या, या पिकांची लागवड शेतीत करतात.
3  शेती करत असताना तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ?
उत्तर : खाऱ्या  जमिनीला  जी  झाडे  येतात  ती काढावी  लागतात.उखळण  करावी  लागते  उखळण  करताना  त्यांना जमिनीतील  माती  बारिक  करावी  लागते.  खाऱ्या  जमिनीवर  गोडी  माती  टाकावी   लागते  परत. टयाक्टर
लावावा  लागतो.जमिनीला  पाणी  दयावे  लागते. जमिनीला  पाणी  दिल्यानंतर  त्यांना  शेतात  पिक  घेता  येते   त्याच्यांकडे  8  महिने पाणी  नसते  पावसाळ्यात त्याच्यां शेतात पूर येतो  पिकांचे  नुकसान  होते  इत्यादी  समस्यांना  सामोरे  जावे लागते.
4  युवा  पिढीला  तुम्ही शेतीबद्दल  काय  सांगाल ?
उत्तर :  आजची  युवा  पिढी  शेती  करणार  नाही. आजची युवा  पिढी   तंत्रज्ञानाच्या  मदतीने  पुढे प्रगती करत आहे त्यामुळे  शेती मागे  पडत   चालली  आहे  शेतीत   उत्पन्न   खूप   आहे   फक्त  आपल्याला  मेहनत  घ्यायला  लागते.
5  पूर्वीची  शेती  आणि  आधुनिक  शेती  यामध्ये   तुम्हाला  काय  फरक वाटतो  ?
उत्तर  :  पहिला  ते   हाताने   जमीन  खोदून  शेती  करायचे  आणि  आता  त्यांनी  सरकारच्या  मदतीने   स्वतः चा   ट्याक्टर  घेतलाय. ट्याक्टरच्या  मदतीने   शेतात   शेती  करतात  त्यांचे   कुटुंब   उदरनिर्वाहासाठी   शेतीवर   अवलंबून   आहे.
6  तुम्हाला  शेतीतून  किती  उत्पन्न  मिळते ?
उत्तर :  त्यांना  महिन्याला  4000/- रू  पैसे  मिळतात   ते त्याच्या  शेतातील  तुळशी हे पिक  मुंबईला  बाजारपेठेत  विकतात  प्रत्येक  वेळी  पाहिजे  तसा नफा  मिळत   नाही  त्यांचे  नुकसानही   होते. बाजारपेठेत विकल्यानंतर  त्यांना  पैसे मिळतात.
7  तुम्ही  शेतीत  पिकांची  लागवड  कधीपासून   करतात ?
उत्तर : साधारणपणे  ते  हिवाळ्यापासून  शेतीत पिकांची  लागवड  करतात.शेतीत  पिकांची लागवड  करताना  त्यांना  खूप  त्रास  होतो. त्यांची  खारी  जमीन  आहे .खाऱ्या  जमिनीत गोडी  माती  टाकून  त्यांना  शेती करावी  लागते. खाऱ्या  जमीनीत  सहजासहजी  पिकांची लागवड  होत  नाही .बहुतेक  वेळा  त्यांच्या पिकांचे  नुकसान  होते.त्यांना  पाण्याचा  पण त्रास  आहे. त्यांनी  त्यांच्या   शेतात   एक  खड्डा खणलाय  त्या   खडड्यात   ते  पावसाचे  पाणी साठवून  ठेवतात  त्या  पाण्याचा  शेतीत  वापर करतात.
8  तुम्ही  शेतीत  कोणत्या  खतांचा  वापर  करतात ?
उत्तर : शेतात  युरिया,  सल्फेट, हे  खत  वापरतात.
युरिया : युरिया  खत  रासायनिक  खत  आहे युरिया हे पिकांच्या  उत्पादनासाठी  आणि जमीनीची  सुपीकता  वाढविण्यासाठी रासायनिक  खतांचा  वापर  करतात  युरियेच्या चुकीच्या  वापरामुळे  जमीन संक्रमित होते. युरियच्या अधिक  वापरामुळे जमीनीवर दुष्परिणाम होतो.
सल्फेट  :  सल्फेट   खताचा  वापर  पिकांची क्षमता  वाढविण्यासाठी  शतीत  फवारणी करतात. सल्फेट  खताचा  वापर   अधिक  उत्पादनासाठी  योग्य  वेळी  समान  प्रमाणात खतांचा  वापर  करणे  आवश्यक  आहे.
9  शेतीमधील  जमीन  कशी  आहे हे  कसे  ओळखता ?
उत्तर :  ज्या  जागांना  जमीनीत  भेगा  पडलेल्या असतात  त्या  जमिनीत  पिकांची  लागवड  केली  जात  नाही  ती  नापीक  जमीन असते.जी माती  सुपीक  असते  त्या  जमिनीत  पिकांची लागवड  केली  जाते  यावरून  जमीनीची  ओळख   होते.
         
10  शेती  करत  असताना  तुम्ही  अजून कोणता व्यवसाय  करतात ?
उत्तर :  शेती   करत  असताना  त्या  मासेमारी  व्यवसाय  करतात  मासे  विकतात. मासे  विकून थोडे  फार  पैसे  मिळतात  त्यांच्या घरात  कोणी कामाला  जात  नाही  त्यामुळे  त्यांनी  शेती व्यवसाय  सुरू  केलाय.उदरनिर्वाहासाठी शेती व मासेमारीवर  अवलंबून  आहेत.

No comments:

Post a Comment