आजच्या पिढीची सगळयात मोठी समस्या मोबाईल आहे. मोबाईलने त्याचे आयुष्यच बदलून गेले आहे. आजची पिढी आई-वडिलांपासून दुरावत चालली आहेत.शहरांमध्ये मुले शाळेत कॉलेजात नोकरीमध्ये व्यस्त असतात यांच्यातील जवळीकता संवाद कमी होताना दिसून येतो.मोबाईलच्या अतिवापराने तरुणाईच्या मनावर परिणाम होतात.साहजिकच जगण्याच्या स्पर्धेत संवाद तुटत जातो.आधुनिक युगात जगत असताना घरातल्या माणसापेक्षा आपल्यासाठी आपला मोबाईल प्रिय वाटू लागला.मोबाईलमुळे त्यांची भाषा बदलत चालली आहे. तोडांने बोलण्याऐवजी हाताने हातवारे करून संवाद साधत आहेत. जीवनात सोप्या पद्धतीने भाषेचा वापर करत आहेत. आजची पिढी आधुनिक उपकरणाच्या आहारी इतकी गेलेली आहे की त्यांना वाचन, गायन, मैदानी खेळ आणि त्या माध्यमातून विकसित होणारी बुद्धी, घडणारे मन अन शरीर यांचे महत्त्व राहिलेले नाही. संस्कार असलेले कार्यक्रम त्यांना आवडतच नाही त्यांना डिजे, हिप-हॉप यांसारखी गाणी आवडत आहेत.संगणक आणि मोबाईल यांवरच सर्व सोयी उपलब्ध असल्याने कामचोरपणा आणि आळशी वृत्ती बळकावत चालली आहे. आदर,समानता ही मूल्य आजच्या पिढीला कळतच नाही.
मुलांचे आजचे वेळापत्रक इतके व्यस्त असते की त्यांची स्थिती स्पर्धेतील घोड्यासारखी झाली आहे. शाळा, अभ्यास, शिकवणी यातच अधिक वेळ जात असल्याने मिळणाऱ्या रिकाम्या वेळेत संगणकीय खेळ व मोबाईल वरील खेळ, फेसबुक, व्हॉट्स अप यात गुंतून राहतात. त्यामुळे मैदानी खेळ मागे पडले आहेत. मुलांना योग्य मार्गदर्शन दिले पाहिजे.मुलांनी कामाच्या वेळीच मोबाईलचा वापर केला पाहिजे. समाजाला बळकट करण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये असल्याने महिलांनी आजची युवा पिढी सुदृढ व संस्कारक्षम बनविण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.आजची युवा पिढी संस्कारक्षम झाली तर आपल्या भारताला प्रगत व्हायला वेळच लागणार नाही.
मुलांचे आजचे वेळापत्रक इतके व्यस्त असते की त्यांची स्थिती स्पर्धेतील घोड्यासारखी झाली आहे. शाळा, अभ्यास, शिकवणी यातच अधिक वेळ जात असल्याने मिळणाऱ्या रिकाम्या वेळेत संगणकीय खेळ व मोबाईल वरील खेळ, फेसबुक, व्हॉट्स अप यात गुंतून राहतात. त्यामुळे मैदानी खेळ मागे पडले आहेत. मुलांना योग्य मार्गदर्शन दिले पाहिजे.मुलांनी कामाच्या वेळीच मोबाईलचा वापर केला पाहिजे. समाजाला बळकट करण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये असल्याने महिलांनी आजची युवा पिढी सुदृढ व संस्कारक्षम बनविण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.आजची युवा पिढी संस्कारक्षम झाली तर आपल्या भारताला प्रगत व्हायला वेळच लागणार नाही.

No comments:
Post a Comment