Sunday, February 2, 2020

रेडिओ

आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीचे श्राव्य माध्यम आहे. ग्रामीण लोकांचे आवडते माध्यम आहे. रेडिओचा शोध 1885 साली मार्कोनी याने लावला. भारतात रेडिओची सुरुवात 1923 साली झाली. स्वतंत्रानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली. विविध भारताने रिडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. टीव्हीच्या आगमनानंतर रेडिओचा प्रसार कमी झाला. रेडिओच्या बाजाराची व्याप्ती वाढण्यास रेडिओच्या माध्यमातून जाहिराती आणि सामाजिक संदेश प्रसारित केले जायचे.आतापर्यंत रेडिओच्या माध्यमातून हजारो जिंगल्स जन्माला आल्या आहेत.
        आकाशवाणी ही भारताच्या विविध प्रदेशात अनेक वेगवेगळ्या सेवा पुरविते.ही सर्वात जास्त व्यावसायिक तसेच सर्वात जास्त प्रसिद्ध सेवा आहे. सध्या रेडिओच्या आवाजावर अनेकांचे लक्ष केंद्रित होऊ लागले आहे. आकाशवाणीच नव्हे तर इतर माध्यमातूनही  आवाजाचा वापर वाढला आहे. माध्यमांप्रमाणे रेडिओचा व्यवसायही जाहिरातीवर चालत असतो. रेडिओ हे साधन सोपे स्वस्त असल्याने अनेक उत्पादने आपल्या जाहिराती रेडिओच्या माध्यमातून देण्याला पसंती देतात. पूर्वीचे माणस रेडिओ ऐकायला पसंत करतात. सकाळी 11 वाजता सिनेमातली गाणी लागायची. संध्याकाळी 7 वाजता बातम्या लागायच्या.पूर्वी पूर्ण कुटुंब एकत्र बसून रेडिओ वरची गाणी ऐकायचे. आता कोणाला वेळ मिळत नाही आता सगळे आपल्या कामात व्यस्त असतात. पूर्वी रेडिओच्या लोकांच्या जीवनात महत्त्वाचा वाटा आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषणे अंतर्गत सुरु.झालेल्या रेडिओचा प्रवास सर्वसमावेशक आहे. टीव्ही प्रमाणे सगळ्या गोष्टी आयत्या देण्याचा मार्ग रेडिओमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे विचार करायला ,कल्पना करायला उपलब्ध नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संधी,औपचारिक व अनौपचारिक शिक्षण याचा समावेश रेडिओ आपल्या विविध कार्यक्रमातून करत असतो. आता रेडिओ कोणाकडे सहजा-सहजी बघायला मिळत नाही. टीव्ही आल्यानंतर रेडिओचा प्रसार कमी झाला.

No comments:

Post a Comment