निसर्ग आणि आपले नाते अतूट आहे.निसर्गाच्या छायेत आपण सतत वावरत असतो. पाऊस,झाड,पक्षी,समुद्र आकाश यांची ओढ मनाला वाटते. आपण एकटे नाही असे जाणवते. निसर्गाच्या आणि माणसाच्या जन्मापासून निमार्ण झालेला नात्याचा प्रवास विलक्षण आहे. मला निसर्गात रमायला खूप आवडते. इवली इवली रानफुले, रानवारा,फांदयात गुंतलेली झाडे ही सगळी निसर्गाची स्मृतिचित्रे मनात गडद झालेली आहे. पिंपळ, वड, गुलमोहर, चिंच, चाफा अशा कितीतरी झाडांना आपण ओळखत असतो. झाडे आपल्याशी बोलत नाही पण त्यांचे तन आणि मन फळाफुलांनी बहरून आलेले असते. झाडांशी आपले नाते जवळकीचे असते. आपला स्पर्श,आपल्या जाणिवा झाडांना कळत असतात. झाड फुलांनी बहरून आले की आपणही बहरून येत असतो. आंब्याला मोहर आला की रान सुंगधाने बहरून जाते.जंगलातून फिरताना झाडांच्या सावल्यांमध्ये हरवून जाणाऱ्या आपल्या सावल्या आपल्यालाच ओळखता येत नाही. निसर्गातील वातावरण किती सुंदर आहे. निसर्गातून खूप काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहे. जर निसर्गच नसता तर आपल्याला काही निसर्गाच नाते अनुभवायला मिळाले नसते. निसर्ग मला माणसापेक्षा जवळचा सोबती वाटतो. निसर्ग हा कोणताही भेदभाव करत नाही. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो ते घ्यायला आपले दोन इवले हात अपुरे पडतात. काहींनी आपले संपूर्ण जीवन निसर्गाच्या सानिध्यात घालवले. निसर्गाने आपल्या मानव जातीला जन्म दिला आहे संगोपन केले आहे. आपण किती नशीबवान आहेत की आपला जन्म गावात झाला. निसर्ग खरंच आपला मित्र आहे.
No comments:
Post a Comment