Tuesday, September 10, 2019

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार ही मानवी समाजाला लागलेली कीड आहे. समाजाचा पायाच आगदी खिळखिळा झाला आहे. भ्रष्टाचारामुळे लोक अगदी लाचार
झाले आहेत. व्यापारी जगात लाज मोठ्या प्रमाणात दिली व घेतली जाते. भ्रष्टाचार जसजसा वाढत गेला तसतसा त्याचा परिणाम वाईट होत गेला आहे. गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचारामुळे कित्येक राष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे भ्रष्टाचाराचा सर्वात जास्त त्रास गरिबांना सहन करावा लागतो.पण हा भ्रष्टाचार कधी थांबेल का? आज भ्रष्टाचार सर्वसामान्य का होत चालला आहे? पहिले कारण अनेकांच्या मते काम करुन घेण्याचा हा सोपा आणि एकमेव मार्ग असतो. दुसरे कारण म्हणजे त्यांना होणारी शिक्षा व दंड ते लाज देऊन टाळू शकतात. तिसरे कारण नेते, पोलिस,न्यायाधीश यांसारखे प्रतिष्ठित लोक भ्रष्टाचाराकडे दुलर्क्ष करतात. भ्रष्टाचारी लोक इतरांना होणाऱ्या त्रासाची पर्वा करत नाही कारण त्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. लोकांना कितीही पैसा कमावला तरी त्यांचे समाधान होत नाही. भ्रष्टाचारापासून भ्रूणहत्या, स्त्रियांचे लैंगिक शोषण, अत्याचाराविरूद्ध कायदे असूनही असे प्रकार घडतात ना? कारण अजूनही स्त्रिया भ्रष्टाचारावर आवाज उचलत नाही त्रास सहन करत बसतात.
स्त्रियांनी भ्रष्टाचारावर पाऊले उचलली पाहिजेत. स्त्रियांना न्याय मिळायलाच पाहिजे. कुठेतरी याला शासन जबाबदार आहे. कारण शासन भ्रष्टाचाराविषयी पाऊले उचलत नाही असच जर घडले तर भ्रष्टाचाराचा प्रश्न सुटणारच नाही. अजूनही काही गावात भ्रष्टाचार थांबलाच नाही कारण ते मुकाट्याने त्रास सहन करुन घेत आहेत. मुलांना अजूनही संरक्षणाची गरज आहे हे संरक्षण शासनाकडून मिळायला हवे. आज प्रत्येक नागरिकाने भ्रष्टाचाराविषयी पाऊले उचलावी. आपल्या भारताची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर आजपासून सर्वानी प्रतिज्ञा करावी की मला कितीही त्रास पडला कामाला कितीही वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही.

No comments:

Post a Comment