प्रदूषण म्हणजे घातक किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणार निचरा.प्रदूषण मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा,जल,मृदा अशा अनेक घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळण्याने पर्यावरण दूषित होते. मोठमोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या वाढल्याने लाकूड व दगडी कोळसा यांचा इंधन म्हणून वापर वाढला यांमुळे शहरे ओंगळ झाली. हायड्रोकार्बने,जड धातू, कीटकनाशके ,क्लोरिन, सांडपाणी, प्लास्टिक,मोकळ्या जागेवर फेकलेले अन्न, मलमूत्र, रसायने, तुटलेल्या वस्तूचे ढिगारे,इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी जैविक-अजैविक अवशिष्टामुळे प्रदूषणाच्या जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणात किरणोत्साराचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे. औद्योगिक वसाहती व कारखान्यातील रासायनिक पदार्थ कोणत्याही नदी/नाले/तलाव इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.नदीत कपडे धुणे,भांडी घासणे,पाण्यातील जीव मृत होऊन कुजणे,रासायनिक रंगकाम केलेल्या प्लास्टर आॅफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्तीच्या विसर्जनामुळे अशा अनेक कारणांमुळे प्रदूषण होत आहे याला जबाबदार मानव आहे.
प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना
1. सेंद्रिय शेतीचा वापर करणे, रासायनिक खते कीटकनाशके मर्यादित प्रमाणात वापरणे.
2. शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरुन सणांचा आनंद लुटणे,जलप्रदूषण करणे टाळणे.
3. कारखान्याचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.
4. अशुद्ध पाण्याची निर्मिती कमीत कमी प्रमाणात कशी होईल याची काळजी घेणे.
5. पाणी उकळून आणि त्यामध्ये तुरटी फिरवून पाणी पिणे.
6. घरगुती अशुद्ध पाणी योग्य प्रक्रिया करून नदीमध्ये सोडणे.
Tuesday, September 10, 2019
प्रदूषण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment