माझी शाळा म्हणजे आदर्श विद्यालय बोंळिज. आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो एक आई, परिसर,शाळा.वाढताना आपण जास्तीत जास्त वेळ शाळेतच घालवला. मला शाळेत जायला खूप आवडायचे.शाळेत घालवलेले एक-एक क्षण अजूनही आठवतात. शाळेची काय मज्जाच वेगळी होती. आपल्याला शिस्त ही शाळेने शिकवली. शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते काही वेगळेच होते. सगळे लहान असताना शाळेत जायला रडायचे मात्र मी न चुकता रोज शाळेत जायची.मला शाळेची खूप आवड होती. शाळेत मित्र-मैत्रिणी सोबत मारलेल्या गप्पा, एकमेकांबरोबर खाल्लेला डब्बा अजूनही स्मरणात आहे. पूर्वी शाळेत खूप मज्जा यायची. मैत्रिणीसोबत केलेली मस्ती काही वेगळीच होती. कसे हे 10वीचे वर्ष संपले काही कळालेच नाही. मन भरून येते खरंच मित्रांनो शाळेची ओळख काही वेगळीच असते. मला अजूनही शाळेचा एक एक क्षण हवाहवासा वाटतो. शाळेत परत जावेसे वाटते जसे शाळेत वातावरण होते तसे वातावरण कुठेच नाही. शाळेत मित्र-मैत्रिणीच्या सहवासात राहणे, शिक्षकांशी आपुलकीचे नाते काही वेगळेच होते. शाळेचे दिवस कसे निघून गेले समजलेच नाही. परत लहान व्हावेसे वाटते. आपण का इतके मोठे झाले? मला माझ्या शाळेचा खूप अभिमान वाटतो.शाळेचे चित्र डोळ्यासमोर येतेय.शाळेत परिक्षा आली की सगळ्यांची अभ्यासाची सुरुवात.पेपर संपले की परत बर वाटायचं. पेपर असले की सगळे प्रामाणिकपणे अभ्यास करायचे. सगळ्यांमध्ये स्पर्धाच सुरू कोणी किती अभ्यास करतो कोणाला जास्त गुण मिळणार याची वाटच पाहत असतात. शाळेसाठी जितक लिहाव तितके शब्दच अपुरे आहेत. शाळेचे दिवस संपले की असे वाटते जणू काही आयुष्यच संपले आहे. जीवनाचा प्रवाह थांबला आहे. क्षणभर विश्रांतीच घेतली आहे. शाळेसारखे मार्गदर्शन महाविद्यालयात मिळत नाही. शाळेनंतर स्वःतचे निर्णय घ्यायला आपण मोकळे झाले. कोणीही मार्गदर्शन करायला नसते. आपली प्रगतीची दिशा आपणच निवडायची. 10वीचे वर्ष संपल्यानंतर माझा शाळेशी संपर्क संपला.
विश्रांतीच घेतली आहे. शाळेसारखे मार्गदर्शन महाविद्यालयात मिळत नाही. शाळेनंतर स्वःतचे निर्णय घ्यायला आपण मोकळे झाले. कोणीही मार्गदर्शन करायला नसते. आपली प्रगतीची दिशा आपणच निवडायची. 10वीचे वर्ष संपल्यानंतर माझा शाळेशी संपर्क संपला.
No comments:
Post a Comment